सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

वर्णमाला –

 

वर्णमाला –

 

1)  अं आणि अः यांना काय म्हणतात ?

1)  स्वरादी         2) अनुस्वार     3) स्वर         4) मूलवर्ण

2)  खालीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ?

1)                2)ख          3) भ           4)ध

3)  सजातीय स्वरांची जोडी ओळखा .

1)                2)  अ इ      3) इ ए          4) अ ई

4)  पुढीलपैकी कोणती दोन व्यंजने जोडाक्षरे आहेत ?

1)  ग घ             2) ज झ      3)  प फ         4)  क्ष ज्ञ

5)  घर्षण व्यंजन ओळखा .

1)                 2)          3)स             4) च

6)  खालील अक्षरातील व्यंजन ओळखा .

1)                2) आ            3)          4) य

7)  महाप्राण व्यंजन ओळखा .

1)                  2) ळ             3) क्ष         4) ज्ञ

8) पुढीलपैकी कोणते व्यंजन कंठस्थानी आहे ?

1)                 2)              3)प          4) क

9)  अनुनासिकांना असेही म्हणतात .

1)  मात्रा           2) परसवर्ण    3)  सजातीय स्वर    4) विजातीय स्वर

10)  प फ ब भ म या व्यंजन उच्चार प्रकाराला ..............  म्हणतात

1)  कंठ्य         2) तालव्य       3)  ओष्ट्य       4) वरील सर्व चूक

11)  ङ ञ ण न म यांना कोणत्या प्रकारचे वर्ण म्हणतात ?

1)  स्वरादी         2)  अनुनासिक  3) व्यंजन          4) स्वर

12)  मुल ध्वनीच्या यादीला पुढीलपैकी काय म्हणाल ?

1) वर्ण            2)वर्णमाला        3) लिपी          4)दृश्यचिन्हे

13)  अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना आधीच स्वर यावा लागतो म्हणून त्यांना ............असे म्हणतात .

1)  स्वर          2) स्वरादी        3)अनुस्वार         4) व्यंजन

14) संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला  मूर्धन्य  वर्ण कोणता ?

1)              2) ट            3)ढ                4)ळ

15)  क्ष आणि ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखतात ?

1)  संयुक्त व्यंजने  2) व्यंजने  3) कठोर व्यंजने   4) मृदू व्यंजने

16) ख झ  या वर्णांना काय म्हणतात ?

1) कठोर व्यंजन    2) मृदू व्यंजन 3)महाप्राण     4)स्वतंत्र

17)  खालीलपैकी नाद वर्ण कोणता ?

1)             2) फ         3) द          4)ख

18)  खालीलपैकी गटात न बसणारे अक्षर ओळखा

1)              2)इ            3) ई         4)उ

19)  खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो ?

1)  वार           2) गृह          3) धन       4)पुस्तक

20) वर्णमालेमध्ये अर्ध स्वरांना काय म्हणतात ?

1)  ऊष्मे          2)महाप्राण        3)अंतस्थ     4)व्यंजने

21)  खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते ?

1)             2)ज              3)द         4)ब

22)  उच्चार स्थानानुसार तालव्यवर्ण कोणता ?

1)              2) ए             3)ऋ          4)आ

23) पंगत या शब्दातील अनुस्वाराचा  उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान आहे ?

1)  वंदन          2) संरक्षण           3)पंख       4)संधान

24)  ज्ञानचक्षु या शब्दात एकूण मूलध्वनी किती आहेत ?

1) 10           2) 11           3) 9              4) 8

25) जीवन चक्र या शब्दातील च या वर्णाचे उच्चार स्थान कोणते ?

1) दंततालव्य     2) कंठ           3)तालव्य         4)मूर्धन्य

26) कृपा कलृपती ज्ञानेश्वर नैऋत्य अमृतध्वनी या शब्दांमध्ये एकूण जोडाक्षर किती आहेत ?

1) 6           2)4               3)5               4)7

27)  मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो ?

1)अर्धमागधी  2)देवनागरी         3)पाली           4)मोडी

28) खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर हा संयुक्त स्वर नाही ?

1)        2)ए                 3) ऐ           4)ओ

29) ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनला आहे  ?

1) अ + इ    2)आ+ उ            3)आ + ऊ      4)अ + ऊ

30) खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?

1) ए= आ + इ  2) ओ = अ ऊ   3)औ = आ + ऊ   4)ऐ = अ + ई

31) व या वर्णाचे उच्चार स्थान कोणते

1) दंतौष्ट्य     2)कंठौष्ठय       3)ओष्ठय          4)मूर्धन्य

32) खालीलपैकी कोणत्या अनुनासिकाचे उच्चार स्थान मूर्धन्य आहे ?

1)          2)ङ            3)ञ             4)ण

33) खालीलपैकी कोणते मृदू व्यंजन दंत्य आहे ?

1)          2)थ            3)म             4)त

34)  चक्र या शब्दातील स हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

1) तालव्य      2)मूर्धन्य      3)दंततालव्य        4)कंठतालव्य

35) जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे १

1) तालव्य       2)मूर्धन्य      3)दंततालव्य       4)कंठतालव्य

36) खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार तालव्य आहे ?

1) जमात        2)जल        3)जावई            4)जात

37)  खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्य आहे ?

1) जरा         2)चंद्र          3)छत्री             4)जन्म

38) खालीलपैकी  ओष्ठय  असलेले कठोर व्यंजन कोणते

1)             2)प           3)म              4)भ

39)  खालीलपैकी उच्चारानुसार  मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता

1)            2)र            3)ष              4)स

40)  ऋ हा स्वर  खालीलपैकी कोणत्या प्रकारचा स्वर आहे १

1) ओष्ठ्य        2) मूर्धन्य       3)तालव्य         4)कंठ्य

41) खाली दिलेल्या स्वरांच्या यादीतून संयुक्त स्वर ओळखा.

1) अ आ          2) इ उ      3) ए ऐ     4) ओ औ

1) पर्याय 1व3     2)पर्याय 2व4   3) पर्याय 1 व 4      4)पर्याय 3 व 4

42) मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत ?

1)  12          2) 2           3) 34           4) 14

43) संयुक्त नसणारा स्वर कोणता ?

1) ए           2) औ          3)ई             4)आ

44) मराठी वर्णमालेत किती स्पर्श व्यंजने  आहेत ?

1)  12          2) 2           3) 34           4) 14

45) ओष्ट्य उच्चार स्थान असणारे स्वर कोणते ?

1) उ ऊ       2) इ ई           3) ए ऐ           4) अ आ

46) अ आ - या वर्णाचे उच्चारस्थान कोणते ?

1) मूर्धन्य     2) कंठ्य          3) तालव्य          4) दंत्य

47) कर्तव्यदक्ष या शब्दात किती व्यंजने आली आहेत ?

1) आठ         2) सात         3) सहा            4) नऊ

48) ज्ञानामृत  या शब्दात किती व्यंजने आली आहेत ?

1) आठ         2) सात         3) सहा            4) नऊ

49) खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार म या अनुनासिकाप्रमाणे होतो ?

1) अंतर         2) अंबर         3) अंजन         4) अंगण

50) ज्ञानेंद्रिय  - या शब्दात किती व्यंजने आली आहेत ?

1) आठ         2) सात         3) सहा            4) नऊ

 

गणित सराव

*  पंचकोनांच्या सर्व अंतर्गत कोनांची बेरीज किती ?

*  एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग ताशी 100 किलोमीटर असेल आणि चोरांची गाडी ताशे 80 किलोमीटर वेगाने धावत असेल त्या दोघांमध्ये 10 किलोमीटर अंतर असेल तर किती वेळेत पोलीस चोरास पकडतील ?  

* पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 20 टक्के गुण जास्त आहेत व गीताला 10 टक्के गुण कमी आहेत दोघींच्या गुणामधील फरक 120 असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?

*  एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती किलोमीटर ?

*  कोल्हापूरहून 240 किलोमीटर अंतरावरील पुणे येथे एका कामासाठी रवी मोटार सायकल वरून 6 तासात गेला. काम आवरून परतताना गाडीचा वेग  वाढवून अवघ्या 4 तासात कोल्हापूरला पोहोचला. तर परतताना रवीने वेग ताशी किती किलोमीटरने वाढवला ?

*  मुंबई ते अहमदाबाद अंतर 2000 किलोमीटर आहे या दोन्ही ठिकाणाहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे ताशी 120 किलोमीटर व ताशी 80 किलोमीटर वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळाने भेटतील ?

*  ताशी 45 किलोमीटर  सरासरी वेगाने जाणारी गाडी जर 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारीत मुक्कामावर 90 मिनिटे  लवकर पोहोचते .तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ?

* 5 महिला किंवा 4 मुली एक काम 30 दिवसात पूर्ण करतात .तर 15 महिला व 8 मुली तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?

*  अंकिताला इंग्रजी सोडून इतर पाच विषयात सरासरी 60 गुण मिळाले . इंग्रजीमधील गुण मिळवल्यास सहा विषयांचे सरासरी 61 होते तर त्याला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले ?

*  एका विद्यार्थी वस्तीगृहातील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये होतो .तर त्या च वस्तीगृहात 32 विद्यार्थ्यांचा  7 दिवसाचा खर्च किती होईल १

 * 20% सवलत पिल्याने मासिकाची किंमत 596 रुपये असेल तर मासिकाच्या मूळ किंमत किती ?

सरावासाठी उदाहरणे गणित

 "  1 ते 100 मध्ये दोन अंकी संयुक्त संख्या किती आहेत ?

*  120 लिटर अल्कोहोल आणि पाण्याच्या मिश्रणात अल्कोहोल आणि पाण्याचे गुणोत्तर 5:7आहे जर मिश्रणात 30 लिटर पाणी मिसळले तर अंतिम मिसळणातील अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर शोधा १

*  एका रांगेत प्रत्येकी दहा फूट अंतरावर एक झाड आहे तर पहिल्या व पाचव्या झाडातील अंतर किती फूट असेल ?

*  क्रमवार एक ते दहा संख्यांच्या घनांची बेरीज किती ?

*  एका पाठ्यपुस्तकात एकूण 892 पाने आहेत त्याचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे .पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागात असलेल्या पानांपेक्षा 52 पाने कमी आहेत . पुस्तकाच्या दुसऱ्या भागात एकूण किती पाने आहेत ?

*  एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 20 किलोमीटर प्रतितास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 30 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग किती ?

*  एक घड्याळ  3 मिनिटाला 5  सेकंद पुढे जाते सकाळी 7  वाजता ते बरोबर लावले .त्याच दिवशी दुपारी घड्याळ्यात सव्वाचार ही वेळ दिसत असेल . तर खरी वेळ कोणती ?

*  एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले . प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता .तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता

*  एक लाकडी पलंग 12 टक्के तोट्याने विकला त्याऐवजी 3 टक्के नफा घेवून विकला असता तर त्याला 630 रुपये जास्त मिळाले . असते तर पलंगाची खरेदी किंमत किती ?

*  एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 8 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनिट 20 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारेल ?

* एका बोटीमध्ये 10 व्यक्ती वसलेले आहेत. बोटीमधील 40 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी 1.5 किलोग्रॅम ने वाढली तर नवीन व्यक्तीचे वजन काढा ?

*  दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 195 आहे . तर त्या दोन विषम संख्या दरम्यान असणारी  समसंख्या कोणती ?

* आयताच्या कर्णाची लांबी 61 सेंटीमीटर व एका बाजूची लांबी 60 सेंटीमीटर आहे तर त्या आयताची परिमिती किती ?

* एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती ?

* 9 उभ्या व 9 आडव्या रेषा असणाऱ्या एका प्रमाणित बुद्धिबळपटावर एकूण किती आयत तयार होतील ?

गणित सरावासाठी उदाहरणे

 *  1105 चॉकलेट 85 विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वाटले की प्रत्येक मुलाला 11 चॉकलेट दिली तर प्रत्येक मुलीला 16 चॉकलेट मिळतात तर मुलींची संख्या किती

*  एका रांगेत प्रत्येक 10 फूट अंतरावर एक याप्रमाणे 13 झाडे लावलेली आहेत तर पहिल्या व दहाव्या झाडातील अंतर किती ?

*  एका संख्येला 12 ने गुणण्या ऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती ?

*  एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेटीज 2795 आहे व सरासरी 65 आहे तर त्या वर्गात मुले किती असतील ?

*  विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्याची त्या वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?

* सुदर्शन 53 % गुणांनी उत्तीर्ण झाला त्याला एकूण 371 गुण मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती ?

*  ACT/AT=11 तर ACT कोणती संख्या असेल ?

*  महेश चा पगार अमोल पेक्षा 20 टक्क्याने कमी आ .हे तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती टक्के जास्त आहे ?

*  एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10  वर्षे आहे जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते तर शिक्षकाचे वय किती ?

* पाच संख्यांची सरासरी 1000 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल ?

*  पाच महिलांचे सरासरी वजन  40 किलो आहे सरिताचे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिताचे वजन किती?

*  बँकेशी केलेल्या करारानुसार एका व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमांच्या काही हप्त्यात करायचे आहेत .18 हप्ते दिल्यानंतर स्वतः 60% फेडली आहे असे त्याच्या लक्षात आले तर करारात ठरलेली हप्त्यांची संख्या किती ?

*  एका संख्येला  7 ने गुणून 5 ने भागावयाचे होते. परंतु त्या ऐवजी चुकून 50 ने गुणून 7 भाग दिला तेव्हा उत्तर 25 आले तर खरे उत्तर काय असले पाहिजे ?

*  एका कपड्याच्या दुकानात तीन खरेदी करा एक मिळेल अशी ऑफर होती तर त्या दुकानात किती टक्के सूट देण्यात आली ?

*  5000 रुपयांची सरळ व्याजाने 16 वर्षात दाम दुप्पट होत असल्यास त्याच दराने त्याच रकमेची 20 वर्षात होणारी रास कोणती ?

*  अमोल व गोपाळ यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे. त्यांच्या वयातील फरक 12 वर्षे आहे. तर गोपाळचे वय किती १

* आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षांपूर्वी आजोबांचे वय किती वर्षे असेल ?

[26/02, 18:58] Vishwanath: व्याजाचा दर 21% वरून 24% केल्यास ग्राहकाला 4 वर्षाचे व्याज 3000 रुपये जास्त मिळते तर मुद्दलाची रक्कम किती

[26/02, 18:59] Vishwanath: काही संख्यांची सरासरी 19 आहे .जर प्रत्येक संख्येला 4 ने भागले .तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती असेल ?

गणित सरावासाठी उदाहरणे

 * तीन वस्तूंची सरासरी किंमत 15000 रुपये आहे .जर त्यांच्या किमती 3:5:7 या गुणोत्तरात असतील तर सर्वात स्वस्त वस्तू किती किमतीची असेल?

* व्यासपीठावर एकूण बारा पाहुणे होते .त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?

*  माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत उरलेले लोक एकटे आहेत त्यापैकी विवाहित लोकांची संख्या 60 टक्के आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती ?

*  एका जंगलात वृक्षांची सध्या संख्या 1,24,416 आहे. वृक्षांची संख्या दरवर्षी 20 टक्क्यांनी वाढली असेल तर पाच वर्षांपूर्वी त्या जंगलात किती वृक्ष होते ?

*  X या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 ही संख्या मिळवली असता x हीच संख्या मिळते तर x बरोबर किती?

*  घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली ती आणखी 30 % वाढविण्याचा प्रस्ताव आहे . प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल ?

*  एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17 % मिळवले असतात 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?

*  एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊन 1862 रुपयांमध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल ?

*  एका शहराची लोकसंख्या 50 000 आहे. दरवर्षी त्या शहराचे लोकसंख्या 20 % नी कमी होते . तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल ?

*  60 मधून एका संख्येची सहा पट वजा केली. तर त्या संख्येचे चारपट उरते तर ती संख्या कोणती ?

*  एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते .जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल ?

*  एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्याची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाय व गुराखी किती आहेत ?

*  एका पुस्तकाची किंमत 20 % नी कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला .तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडेल ?

* एका पिशवीत काही गोळ्या आहेत ज्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. व जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 10 गोळ्या उरतात . तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील ?

*  750 मुलांना 5 दिवसांचा सहलीचा खर्च 8500 येतो. तर 40 मुलांना 17 दिवसांच्या सहलीचा खर्च किती येईल ?

* दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 23 आहे तर मोठी संख्या कोणती ?

*  800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर ?

*  150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो ?

*  एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?

*  पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 20 टक्के गुण जास्त आहेत व गीताला 10 टक्के गुण कमी आहेत. दोघींच्या गुणां मधील फरक 120 चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?

*  एका निवडणुकीत दोन उमेदवार पैकी 35 टक्के मते मिळालेला उमेदवार 6300 मतांनी पराभूत झाला. तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते पडली ?

*  एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे .त्यावर दुकानदाराने 20 टक्के सूट दिली .पुन्हा 20 टक्के सूट दिल्यास घड्याळाची विक्री किंमत किती होईल ?

*  एका पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये आहे दुकानदाराने ते अस्मिताला 153 रुपयाला विकले तर तिला  शेकडा किती सूट मिळाली ?

*  तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे .त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे . तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती रुपये ?

*  खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 असून टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्ची ची किंमत किती ?

सरावासाठी उदाहरणे

 * एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुणा गुणानु क्रमाने 12 वी आली तर शेवटून तिचा की क्रमांक कितवा आहे ?

* एका संख्येचा 25% जर 20 असेल तर त्याच संख्येचा 40% किती ?

* घड्याळाचा मिनिट काटा 12 ओलांडतो तेव्हा दोन वेळा टोल पडतो व मिनिट काटा 3,6, 9 ओलांडतो तेव्हा एकदा तोल पडतो तर त्याच दिवशी सकाळी 10:35 ते ते 3: 50 च्या दरम्यान किती टोले होतील ?

*A ने एक मोबाईल B ला 20% नफ्याने विकला तोच मोबाईल B ने 25% नफ्याने C ला विकला जर तो मोबाईल C ला 15000 रुपयात मिळाला तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती?

* एक छत्री 15% तोटा सहन करून 170 रुपयात विकली ही छत्री 10%नफ्याने विकली असती तर किती किंमत मिळाली असती ?

*78 नंतर येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती ?

* एका संख्येला 16 ने गुणण्या ऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो तर ती संख्या कोणती ?

* जर खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 4: 5 आहे तर शेकडा नफा किती?

* एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे तर शेकडा तोटा किती होईल ?

* पश्चिम आणि ईशान्य या दिशांमधील कोनाचे माप किती ?

* विना ताशी 40 किलोमीटर वेगाने जाते . मीनल ताशी 42 किलोमीटर वेगाने स्कूटर चालवते . नितीन अडीच तासात 120 km जातो . अनंत 5 मिनिटात 3 किलोमीटर जातो तर सर्वाधिक वेग कोणा

* एक व्यापारी प्रत्येकी 2000 रुपये दराने दोन घड्याळाची विक्री करतो .जर एका घड्याळ्यात त्याला 25 टक्के  नफा मिळत असेल. तर दुसऱ्या घड्याळात त्याला 20% तोटा होत असेल. तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती होईल ?

*: जर एका फळ विक्रेत्याला 100 केळी विकून 20 केळ्यांची विक्री किंमत एवढा नफा मिळत असेल तर त्याचा नफा किती ?

* पाच सदस्यांच्या कुटुंबाचे सरासरी वय 18 वर्षे आहे . आजोबांची वय मिळवले असता सरासरी वय 12 वर्षांनी वाढते .तर आजोबांचे वय किती असेल ?

* एका निवडणुकीत दोन उमेदवार आहेत .एका उमेदवाराला 71 टक्के मते मिळाली आणि तो 756 बताने निवडून आला . तर एकूण मतांची संख्या किती ?

* 11 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?

* जेव्हा 4 विणकर 4चटया 4 दिवसात विणतात. याच वेगाने 8 विणकर 8 दिवसात किती चटया विणतील ?

* दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे .तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती ?

* ती सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे . जिला 12, 15 आणि 25 ने पूर्णपणे भाग जातो ?

* एखाद्या संख्येला 4 ने भाग दिल्यावर भागाकार आणि बाकी यांची बेरीज 8 आहे . आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 34 आहे तर ती संख्या शोधा ?

* एका परीक्षेत 900 मुली आणि 1100 मुले बसली त्यांच्यापैकी 40% मुली आणि 50 टक्के मुले पास झाली . एकूण किती टक्के विद्यार्थी  नापास  झाले ?

* एका आयताच्या लांबीत 20 टक्के वाढ .आणि रुंदीत 20 टक्के घट केल्यावर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ किंवा घट होईल ?

*  जर एखाद्या वस्तूला 5 टक्के तोट्याऐवजी 10% नफ्यावर विकले असते. तर विक्रेत्याला 75 रुपये जास्ती मिळाले असते तर वस्तूची विक्री किंमत काय ?

* गव्हाच्या किमतीत 20 टक्के घट झाल्याने एक व्यक्ती 600 रुपयात दहा किलो गहू जास्त विकत घेऊ शकतो . भावात घट झाल्यानंतर गव्हाचा भाव काय आहे ?

संख्याज्ञान

 1) एका शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांची एकूण संख्या 528 आहे जर 21 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक असतील तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?

2) एका शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांची एकूण संख्या 405 आहे जर 26 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक असतील तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?

3)एका शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांची एकूण संख्या 324 आहे जर 35 विद्यार्थ्यांच्या मागे 1 शिक्षक असतील तर एकूण शिक्षकांची संख्या किती ? 

4)एका कुरणात गुराखी व गुरे  यांची एकूण संख्या 156 आहे जर 25 गुरांच्या मागे 1 गुराखी असेल तर एकूण गुराख्यांची संख्या किती ?

5) एका कुरणात गुराखी व गुरे  यांची एकूण संख्या 287 आहे जर 40 गुरांच्या मागे 1 गुराखी असेल तर एकूण गुराख्यांची संख्या किती ?

किल्ल्यावरील प्रश्न वसति गृहावरील प्रश्न

 1)एका किल्ल्यावर 850 सैनिकाना 26 दिवस अन्न पुरते . जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

2) एका किल्ल्यावर 1200 सैनिकाना 60 दिवस अन्न पुरते . जर 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

3) एका वसतीगृहात  400 मुलांना 12 दिवस अन्न पुरते . जर  आणखी 80 मुले  वसतीगृहात जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

4) एका किल्ल्यावर 100 सैनिकाना 10 दिवस अन्न पुरते . जर 2 दिवसानंतर 60 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

5)  एका किल्ल्यावर 600 सैनिक आहेत त्यांना किल्ल्यावरील अन्न 41 दिवस पुरते परंतु 37 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किती दिवस पुरेल  ?

6)  एका किल्ल्यावर 150 सैनिक आहेत त्यांना किल्ल्यावरील अन्न 45 दिवस पुरते परंतु 10 दिवसांनी 25 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किती दिवस पुरेल  ?

7)  एका किल्ल्यावर 200 सैनिकाना 30 दिवस अन्न पुरते . जर 10 दिवसानंतर 50 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

8) एका किल्ल्यावर 150 सैनिक आहेत त्यांना किल्ल्यावरील अन्न 50 दिवस पुरते परंतु 20 दिवसांनी 50 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किती दिवस पुरेल  ?

नफा तोटा

 1) एका वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी  कमी केल्यास त्या वस्तूचा खप 20 टक्क्यांनी  वाढला . तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती ?

2) एका माणसाने दोन घोडे प्रत्येकी 900 रुपयाला विकले . एकावर त्याला 10 टक्के नफा व दुसऱ्यावर त्याला 10 टक्के तोटा झाला. तर त्याचा शेकडा नफा अगर शेकडा तोटा किती ?

3) एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 विकले तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा व दुसऱ्यात 10 टक्के तोटा झाला. तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा अगर तोटा किती टक्के झाला

4)एका विक्रेत्याने दोन घड्याळे प्रत्येकी 720 रुपयांस विकली. तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 20% नफा व दुसऱ्यात 20% तोटा झाला . तर त्या व्यवहारात शेकडा  नफा  अथवा तोटा किती झाला?

5) दोन वस्तू प्रत्येकी 500 रुपयांना विकल्याने एकात खरेदीच्या 8 टक्के नफा व दुसरीत 8 टक्के तोटा होतो. तर या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल ?

6) एका विक्रेत्याने दोन घड्याळे प्रत्येकी 375 रुपयांस विकली. तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 25% नफा व दुसऱ्यात 25% तोटा झाला . तर त्या व्यवहारात शेकडा  नफा  अथवा तोटा किती झाला?

7) एका वस्तूची किंमत 10 टक्क्यांनी  कमी केल्यास त्या वस्तूचा खप 10 टक्क्यांनी  वाढला . तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती ?

8) एका वस्तूची किंमत 30 टक्क्यांनी  कमी केल्यास त्या वस्तूचा खप 30 टक्क्यांनी  वाढला . तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती ?

9) साखरेचा भाव  15  टक्क्यांनी  कमी केल्याने साखरेचा  खप 15 टक्क्यांनी  वाढला . तर पूर्वीच्या उत्पन्नावर  काय फरक पडेल ?

10) एका सिनेमागृहाच्या तिकीटाची  25  टक्क्यांनी  कमी केल्याने तिकीटाचा   खप 25 टक्क्यांनी  वाढला . तर पूर्वीच्या उत्पन्नावर  काय फरक पडेल ?


_____________________________________

अशा प्रकारच्या उदाहरणा मध्ये नेहमीच तोटा होतो .

उदा क्र 1)

(20 चा वर्ग )/100

400/100

4 % तोटा होईल या प्रमाणे सोडवा

नफा तोटा

 1). समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 60 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 12 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

2) समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 20 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 10 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

3) समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 75 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 25 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

4) समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 80 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 16 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

5) समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 90 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 15 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

6) समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 120 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 15 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

7) समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 45 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 5 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

8)समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 85 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 5 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

9) समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 84 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 7 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

10) समान खरेदी किंमत असलेल्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक 225 रुपये आहे व त्यांच्या शेकडा नफ्यातील फरक 15 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?


* सदर सूत्राचा वापर करून सोडवा


( विक्री किमतीतील फरक x 100 ) / शेकडा नफ्यातील फरक .

शिवजयंती विशेष-

 

 

 

शिवजयंती विशेष-

        निश्चयाचा महामेरू.

                   बहुत जनासी आधारू.

                                अखंड स्थितीचा निर्धारु,

                                               श्रीमंत योगी

                                                  -  समर्थ रामदास .

काशी की कला जाती,

               मथुरा की मश्जीद होती,

                                अगर शिवाजी न होते ,

                                             तो सुन्नत होती सबकी

                                                   

आले किती , गेले किती ,

                        उडून गेले भरारा,

                             संपला नाही, आणि संपणारही नाही,

                                                         माझ्या शिवबाचा दरारा.

 

 

कलम नव्हते , कायदा नव्हता

                            तरीही सुखी होती प्रजा

                                        कारण सिंहासनावर होता,

                                                   माझा छत्रपती शिवाजी राजा

 आस्ते कदम,

आस्ते कदम ,

आस्ते कदम,

महाराज,

गडपती,

गजअश्वपती,

भूपती,

प्रजापती,

सुवर्णरत्नश्रीपती,

अष्टावधानजागृत,

अष्टप्रधानवेष्टित,

न्यायालंकारमंडित,

शस्त्रास्तशास्त्रपारंगत,

राजनितीधुरंदर,

प्रौढ प्रताप पुरंदर,

क्षत्रियकुलावतंस,

सिंहासनाधिश्वर,

महाराजाधिराज

राजा शिव छत्रपती

महाराजांचा विजय असो.

                              शिवरायांचा जीवनपट

* १९ फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्म.

* १९ मार्च, १६३० रोजी जिजाऊनी शिवरायांना पुणे येथे लालमहालात आणले.

* १६ मे,१९४० रोजी सई निंबाळकर यांच्याशी विवाह.

*२८ जानेवारी,१६४५ गुजर पाटलास कडक शासन.

*२७, एप्रिल,१६४५ किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा.

*७ मार्च १६४७ कानद खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकला.

* १६४७ साली कोंढाणा किल्ला जिंकला,

* १६४७ साली मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याचे नाव राजगड असे ठेवले.

*१६४८ पुरंदर किल्ला जिंकला.

*१६५६ शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा कनकगिरीच्या युद्धात मृत्यू.

*१४ मे,१६५७ महाराणी सईबाई यांच्या पोटी शंभू राजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म.

*५ सप्टेंबर,१६५९ मध्ये सईबाईंचे निधन.

*१० नोव्हेंबर १६५९ अफजलखान वध. (शिवप्रताप दिन )

*१६६० सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा.

*१६६३पुण्याच्या लालमहालात शायीस्तेखानाची बोटे तोडली.

*१६६४ साली शहाजी राजे यांचे निधन.

*१३ जून ,१६६५ पुरंदरची लढाई व तह.

*४ फेब्रुवारी ,१६७० तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला.

*६ मार्च,१६७३ कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळा किल्ला जिंकला.

*२४ फेब्रुवारी,१६७० सोयराबाई यांच्या पोटी  राजाराम महाराजांचा जन्म.

*६ जून ,१६७४ शिवरायांचा राज्याभिषेक.

*१७ जून,१६७४ रोजी जिजाऊंचे निधन.

*२४, सप्टेंबर,१६७४ शाक्य पद्धतीने शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक.

*३ एप्रिल,१६८० शिवरायांचे निधन .