शिवजयंती विशेष-
निश्चयाचा महामेरू.
बहुत जनासी आधारू.
अखंड स्थितीचा निर्धारु,
श्रीमंत योगी
- समर्थ रामदास .
काशी की कला जाती,
मथुरा की मश्जीद होती,
अगर शिवाजी न
होते ,
तो
सुन्नत होती सबकी
आले किती , गेले किती ,
उडून गेले भरारा,
संपला नाही, आणि
संपणारही नाही,
माझ्या शिवबाचा दरारा.
कलम नव्हते , कायदा नव्हता
तरीही सुखी होती
प्रजा
कारण
सिंहासनावर होता,
माझा छत्रपती शिवाजी राजा
आस्ते कदम,
आस्ते कदम ,
आस्ते कदम,
महाराज,
गडपती,
गजअश्वपती,
भूपती,
प्रजापती,
सुवर्णरत्नश्रीपती,
अष्टावधानजागृत,
अष्टप्रधानवेष्टित,
न्यायालंकारमंडित,
शस्त्रास्तशास्त्रपारंगत,
राजनितीधुरंदर,
प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रियकुलावतंस,
सिंहासनाधिश्वर,
महाराजाधिराज
राजा शिव छत्रपती
महाराजांचा
विजय असो.
शिवरायांचा जीवनपट
* १९ फेब्रुवारी, १६३० रोजी
शिवनेरी किल्ल्यावर जन्म.
* १९ मार्च, १६३० रोजी
जिजाऊनी शिवरायांना पुणे येथे लालमहालात आणले.
* १६ मे,१९४० रोजी सई
निंबाळकर यांच्याशी विवाह.
*२८ जानेवारी,१६४५ गुजर पाटलास
कडक शासन.
*२७, एप्रिल,१६४५ किल्ले
रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा.
*७ मार्च १६४७ कानद
खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकला.
* १६४७ साली कोंढाणा किल्ला
जिंकला,
* १६४७ साली मुरुंबदेवाचा
डोंगर जिंकून त्याचे नाव राजगड असे ठेवले.
*१६४८ पुरंदर किल्ला
जिंकला.
*१६५६ शिवरायांचे थोरले
बंधू संभाजीराजे यांचा कनकगिरीच्या युद्धात मृत्यू.
*१४ मे,१६५७ महाराणी सईबाई
यांच्या पोटी शंभू राजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म.
*५ सप्टेंबर,१६५९ मध्ये
सईबाईंचे निधन.
*१० नोव्हेंबर १६५९ अफजलखान
वध. (शिवप्रताप दिन )
*१६६० सिद्दी जौहरचा
पन्हाळगडाला वेढा.
*१६६३पुण्याच्या लालमहालात
शायीस्तेखानाची बोटे तोडली.
*१६६४ साली शहाजी राजे
यांचे निधन.
*१३ जून ,१६६५ पुरंदरची
लढाई व तह.
*४ फेब्रुवारी ,१६७०
तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला.
*६ मार्च,१६७३ कोंडाजी
फर्जंद यांनी पन्हाळा किल्ला जिंकला.
*२४ फेब्रुवारी,१६७०
सोयराबाई यांच्या पोटी राजाराम महाराजांचा
जन्म.
*६ जून ,१६७४ शिवरायांचा
राज्याभिषेक.
*१७ जून,१६७४ रोजी जिजाऊंचे
निधन.
*२४, सप्टेंबर,१६७४ शाक्य
पद्धतीने शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक.
*३ एप्रिल,१६८० शिवरायांचे
निधन .